100+ शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes in Marathi 2024

If you search good morning quotes in marathi शुभ सकाळ मराठी संदेश then your are in the right place because we provided one of the best whatsapp good morning quotes in marathi and much more quotes so stay with us and enjoy all marathi quotes and status.

Good Morning Quotes in Marathi

आयुष्यातला प्रत्येक क्षण
प्रत्येक दिवस
प्रत्येक सकाळ
आपल्याला खूप सुंदर जावो.

वाट नेईल तिकडे जाणे आणि
शब्द सापडतील तसे गाणे
यामुळे आयुष्याला रंगत येत नाही
कुठे जायचे आणि काय गायचे
हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर
दुःखी व्हायच नसतं
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत…

Read More: Good Morning message in marathi

आकाश कितीही उंच असो
नदी कितीही रुंद असो
समुद्र कितीही खोल असो
पर्वत कितीही विशाल असो
एक लक्षात ठेवा
तुम्हाला या सगळ्यांशी काहीच देण-घेण नाही
तुम्ही आपली चादरीची घडी घाला
आणि कामाला लागा…

ज्याचे जसे चरित्र असते
त्याचे तसेच मित्र असतात
शुध्दता तर विचारांमध्ये असते
माणूस कुठे पवित्र असतो
फुलातसुध्दा किडे असतात
दगडातसुध्दा हिरे असतात
वाईट सोडून चांगले बघा
माणसातसुध्दा देव दिसेल

ज्याला संधी मिळते
तो नशिबवान
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
आनंद शोधू नका निर्माण करा…

संयम ठेवा
संकटाचेहे ही दिवस जातील
आज जे तुम्हालापाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडेपाहतच राहतील…

असं म्हणतात की
काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं
पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं..

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंतकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात
आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही…!!

आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही
परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे.

जीवनात सुख:दुखात साथ देणारं
एक सुंदर नातं असावं
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत
ती पण तुमच्या सारखी..!

जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा
परिश्रम कमी पडत आहेत.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना
जपलेच पाहिजे
कारण कोण कधी उपयोगाला येईल
हे सांगता येत नाही.

good morning love quotes in marathi

यश मिळणे कठीण आहे
परंतु कठीण चा अर्थ
अशक्य असा नाही.

हसत राहिलात तर
संपूर्ण जगआपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…

हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात
अन शब्दच असतात जादूगार
ज्यांनी माणसे जोडली जातात…

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते
आणि जास्त वापरली तर झिजते
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे
मग कोणाच्याही उपयोगात न येता
गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!!

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते..

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते
कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच काही वेगळी असते
विश्वास ठेवा
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठेतरी काही चांगले घडत असते…

आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येक वेळी तेच आपल्यालामिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…

good morning motivational quotes in marathi

पहाट झाली! पहाट झाली
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…Whatsapp बघायची वेळ झाली…!

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर
समोरचा चुकीचाच दिसणार
दोन्ही बाजूने विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.

कुणी तरी मला विचारले
या जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे
मि त्याला हसत उत्तर दिल
वेळ जर का वेळ चांगली असेल तर
सार जग आपल
आणी ती जर खराब असेल तर
कोणीच आपल नाही

फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात
लोखंडाच्या नाही..

उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले अंधारी
रात्र कुठे गडप झाली
मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली
हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे
पसरली खिडकीतून डोकावून आत आली
आणि हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली..
उठा रे आता सकाळ झाली..

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना
बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला..

मन आणि छत्री
यांचा उपयोग तेव्हांच होतो
जेव्हा ते उघडले जातात
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते…

कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा

नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणुन
सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही
सुर्योदय हा होतोच.

वाचा: Good Morning Messages

स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि
सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.

आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल
पण उद्याच्या काळजीत
आजचे सुख हरवू नका…

life good morning quotes in marathi

मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं
खरंच खूप भावनिक असतं
दुर असेल जरी कोणी तरी
मनाने मात्र जवळच असतं.

योग्य लोकांचे हात हातात असतील तर
चुकीच्या लोकांचे पाय धरायची
वेळ कधीच येत नाही..

संगत कधी राजाची करू नका
कधी आपल्याला नोकर बनवून ठेऊ शकेल
माहीत नाही.
पण संगत संतांची करा
कधी देवाची भेट घालून देतील सांगू शकत नाही.

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही
मिळाले तर ते टिकत नाही
आणि टिकले तर ते शोभत नाही
म्हणून जीवनात योग्य ठिकाणी
योग्य व्यक्तीसमोर
आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..

जगातील प्रत्येक गोष्ट
ठोकर लागल्यावर तुटते
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.

ओळखीमधून केलेली सेवा
जास्त दिवस टिकून रहात नाही
पण सेवेमधून झालेली ओळख
आयुष्यभर टिकून रहाते !!

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात
आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास..

आपलं तर एकच तत्त्व आहे
प्रेम द्या प्रेम घ्या
हे जीवन एकदाच आहे
कायम सर्वांसोबत हसत रहा
आयुष्याच्या खेळात तस तर
मी पण खुप व्यस्त आहे
पण वेळेचं कारण सांगुन
आपल्या लोकांना विसरणं
मला आज पण नाही जमत

दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला
ऊब दिली ते घरटं कसं विसरावं
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक “व्यक्तिमत्व” म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते
पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते…

inspirational good morning quotes in marathi

रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो
तसेच आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच
जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

संघर्ष हा वडीलाकडून आण
संस्कार हे आईकडून शिकावे
बाकी सगळं दुनिया शिकवते

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता
आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते.

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील
आयुष्याचे calculation खूप वेळा केले
पण ‘सुख दुःखाचे’ accounts कधी जमलेच नाही
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले की
आठवण’ सोडून काहीच balance उरत नाही..

विश्वास हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनीट लागतो
समजायला दिवस लागतो
आणि सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते…

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर
त्याला ठेवायला जागा लागते
तसं पुण्याचं नाही
ते दिसत नाही, पण वेळ आली की
बरोबर समोर उपभोगता येतं
कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं..

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची
कधीच वेळ येणार नाही
म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा
प्रयत्नवादी व्हा
यश तुमची वाट पाहात आहे

वाचा: good night message marathi

टिकाकारांचा नेहमी आदरच करा
कारण तुमच्या गैरहजेरीत
ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात.

आयुष्यात श्वास आणि विश्वासाची एकसमान
गरज असते
कारण श्वास संपला तर जिवन संपते
आणि विश्वास संपला तर संबंध संपतात.
शुभ सकाळ

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…

रोज येणारा Good Morning जेव्हा अचानक बंद होतो
१ ला दिवस: विसरला वाटते
२ रा दिवस: बाहेरगावी असेल.
३ रा दिवस: आजारी तर नसेल ना ?
४ था दिवस: नक्की काहितरी गडबड असणार.
तुमचा केवळ एक *Good morning सुद्धा
तुम्ही सोबत आणि सुखरूप असल्याची
पावती देऊन जातो…

नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते..

एकाने विचारलं की
सर्वात महाग “जागा” कोणती ?
तो म्हणाला
जी आपण दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो
ती महाग जागा
तिचा भाव करता येऊ शकत नाही
अन् ती एकदा जर गमावली
तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ
अशक्य असतं…

स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा
खांद्याला खांदा मिळवून
पुढे जाण्याने प्रगती आहे
रक्त गट कुठलाही असो
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!

good morning inspirational quotes in marathi

गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ-आल्यावर पैसा नाही तर
माणसंच साथ देतात..

ऋणानुबंध असल्याशिवाय
कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही
फक्त सुर जुळायला हवेत
मग बघा, कसे आयुष्य फुलते
कोणाला “प्रेम देणं”, सर्वात मोठी भेट असते
आणि कुणाकडून “प्रेम मिळविणे”
सर्वात मोठा “सन्मान” असतो…
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा!

ज्याचे मन ताब्यात असेल
त्याच्या ताब्यात सर्व जग आहे.
पण जो मनाच्या ताब्यात आहे
ज्याचा मनावर संयम नाही
त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.
!!शुभ सकाळ!!

भाग्यवान ते नसतात
ज्यांना सगळंच चांगलं मिळत…!
खरे भाग्यवान ते असतात
त्यांना जे मिळत त्याला ते चांगलं बनवतात..

कधी आठवण आली तर
डोळे झाकू नका
जर काही गोष्टी नाही आवडल्या तर
सांगायला उशीर करु नका
कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन
बोलायला विसरु नका
कधी चुक झाल्यास माफ करा
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका
शुभ प्रभात…

कोकिळा स्वतःची भाषा बोलते
म्हणून ती मुक्त आहे
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो
म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतःची भाषा
स्वतःचे विचार आणि
स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा
तरच आयुष्य हे सुंदर असेल.

motivational good morning quotes in marathi

“डोळे” हे तलाव नाहीत,
तरीपण भरून येतात.
“अहंकार” हा शरीर नाही,
तरीपण घायाळ होतो.
“दुश्मनी ” ही बीज नाही,
तरीपण उगवली जाते.
“ओठ ” हे कापड नाहीत,
तरीपण शिवले जातात.
“निसर्ग” हा बायको नाही,
तरीपण कधीतरी रुसतो.
“बुध्दी” ही लोखंड नाही,
तरीपण तिला गंज लागतो.
“माणूस” हा वातावरण नाही,
तरीपण तो बदलला जातो.
काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे
शुभ सकाळ

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही.
शुभ सकाळ

सर्वाना हसवा
पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या
पण कधी कुणाला दुःखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं ह्रदय जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल, तसेच उगवेल.

आनंद प्रत्येक क्षण
तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी
तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे
दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा

एका मिनिटातआयुष्य बदलू शकत नाही
मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
आयुष्य बदलूशकतो..

कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
फारसं मनावर घेवु नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील.

चांगला विचार हाच आपला प्रचार

माणसाचे मोठेपणा हे
त्याच्या वयावर नव्हे,तर
त्याचा विचारांवर आणि
कर्तृत्वावर अवलंबुन असते.!

वाचा: life quotes in marathi

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे
आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच
संपत्ती मोठी नाही.

आपण जसे वागतो
इतरांशी बोलतो
दान करतो
तसेच आपल्याला परत मिळते
त्यामुळे नेहमी चांगले वागा

जीवनामध्ये अडचणी आल्या तर
दुःखी होऊ नका
फक्त एवढेच लक्षात ठेवा कि
अवघड भूमिका नेहमी
चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात

बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही
तेवढी अनुभवातून येते.
गुड मॉर्निंग !!

जर मन सुंदर असेल तर
संपूर्ण जग सुंदर वाटेल.
शुभ प्रभात !!

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको
ही भावना ज्या माणसाजवळ असते
तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो
जिवनात जगतांना असे जगा कि
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…

भुकेलेल्यांना अन्न आणि
तहानलेल्यांना पाणी देने
यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.
शुभ सकाळ!!

romantic good morning quotes in marathi

आपल्यामधील अहंकार काढून
स्वतः ला हलके बनवा
कारण उंच तेच जातात
जे हलके असतात.
सुप्रभात!!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी
आपलीही बोटे सुगंधित करून जातो
आपला दिवस आनंदी जावो !

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला
त्याला शोधण्यासाठी
पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली
एखाद्या गोष्टीचे महत्व
त्याच्या किंमतीवर नसते
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते..

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार आणि कर्मानेच होते
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील…

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा
जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही
इतरांसमोर आदर्श निर्माण कराल
आणि जर तुम्ही हरलात तर
इतरांना मार्गदर्शन कराल.
सुप्रभात!!

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती
पुन्हा जिंकू शकतो
परंतु मनातून हरलेली व्यक्ती
पुन्हा कधीच जिंकू शकत नाही
सुप्रभात !!

मनुष्याची अनमोल संपत्ती
त्याचे वर्तन आहे
आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी
कोणतीच संपत्ती मोठी नाही
शुभ सकाळ !!

आपण जसे वागतो,
इतरांशी बोलतो,
दान करतो
तसेच आपल्याला परत मिळते.
त्यामुळे नेहमी चांगले वागा.
शुभ प्रभात

मनाने जोडलेल्या नात्याला
कोणत्याच नावाची गरज नसते
कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच वेगळी असते
शुभ सकाळ

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही
पण मनाने श्रीमंत नक्की बना
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात.

good morning quotes in marathi for best friend

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही
मिळाले तर ते टिकत नाही
आणि टिकले तर ते शोभत नाही
म्हणून जीवनात योग्य ठिकाणी
योग्य व्यक्तीसमोर
आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा.

प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच
असे नाही
कधीकधी एकटे पण लढावे लागते
पण असे लढा कि साथ न देणारे पण
हात जोडून प्रणाम करतील.

वाचा: मराठी लव्ह स्टेटस

घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन
आपण आपल्यालाच ञास देतो
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा
पुढील मार्ग पहावा
कदाचित परमेश्वराने आपल्याला
यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत
जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची

आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत सकारात्मकरित्या पाहणे
हेच यशाचं गमक

फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात
लोखंडाच्या नाही..

चांगल्या व्यक्तीने अपमान केला
अथवा रागवली तरी चालेल
पण त्याला सोडु नका
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे
अनेक आहेत
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे
फार कमी असतात
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच सुर्य जवळ ठेवा..

पावसाला माहीत नसत
मातीतुन काय उगवणार
तो मनसोक्त कोसळून जातो
आयुष्य असच जगावं
काय भेटणार हे न पाहता
मनसोक्त जगुन परतावं..

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री
स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण
म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण

जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते
तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्कीच असली पाहिजे..

कोणीही चोरू शकणार नाही
अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा
ते म्हणजे “”नाव” आणि “इज्जत”
किम्मत त्यांचीच करा
जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात..

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते
तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही
पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं
कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं…

good morning images with inspirational quotes in marathi

माणसाचां जन्म हा
प्रत्येक घराघरांत होतो
परंतु माणुसकी ही
ठराविक ठिकाणीच जन्म घेते
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.

आयुष्य नावाची screen जेव्हा
लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger
मिळत नाही तेव्हा powerbank
बनून जे तुम्हाला वाचवतात
ते मनजे मित्र तुमच्या सारखे….

माणसाचे मोठेपणा हे त्याच्या
वयावर नव्हे,तर
त्याचा विचारांवर आणि
कर्तृत्वावर अवलंबुन असते.!

ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय
तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते.
कारण आनंदा ची किंमत
त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..!!

आपल्या हजार चांगल्या शब्दांचा
अंत करण्यासाठी
एका चुकीच्या शब्दाकडे
हजार” लोक लक्ष ठेवून असतात.

वाईट दिवस आल्यावर कधी
खचून जाऊ नका
आणि चांगले दिवस आल्यावर
कधी घमंड करु नका
कारण दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात.

डोळे कितीही छोटे असले तरीही
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची
ताकत असते
आयुष्य ही एक देवाने दिलेली
अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून
इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात
परावर्तित होते
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची
इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!

“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
शुभ सकाळ!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!
शुभ सकाळ !

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
शुभ सकाळ!

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
शुभ सकाळ!

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!

नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
शुभ सकाळ!

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
शुभ सकाळ !

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ!

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!

buddha good morning quotes in marathi

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
शुभ सकाळ!

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ!

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ !

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
शुभ सकाळ!

“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
शुभ सकाळ!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.शुभ सकाळ

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही.शुभ सकाळ

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात मनापासून आठवण काढली आहे तुमची पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.शुभ सकाळ

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.शुभ सकाळ

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.शुभ सकाळ

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते.शुभ सकाळ

यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.शुभ सकाळ

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते .शुभ सकाळ

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद त्यालाच मिळतो जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.शुभ सकाळ

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.शुभ सकाळ

चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.शुभ सकाळ

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.शुभ सकाळ

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.शुभ सकाळ

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.शुभ सकाळ

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.शुभ सकाळ

नशिबाला दोष का द्यावा स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावे.शुभ सकाळ

दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.शुभ सकाळ

पावसाला माहीत नसत मातीतुन काय उगवणार तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगुन परतावं.शुभ सकाळ

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडिन निदान प्रयत्न तरी करीनच करीन.शुभ सकाळ

आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.शुभ सकाळ

स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे.शुभ सकाळ

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.शुभ सकाळ

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात परंतु न भेटता दुरून नातं जपन्याला जीवन म्हणतात.शुभ सकाळ

प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल.शुभ सकाळ

यशाचे चांदणे चाखण्यासाठी आयुष्यात माणसाला काबाडकष्ट करणे शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.शुभ सकाळ

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.शुभ सकाळ

ओळखीने मिळालेले काम तात्पुरत्या काळासाठी असते मात्र कामातून निर्माण झालेले ओळख कायमस्वरूपी राहते.शुभ सकाळ

Good Morning Images Marathi

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोडं माणसं.शुभ सकाळ

प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते,मात्र ही संधी ओळखण्याची आवश्यकता असते.शुभ सकाळ

लक्ष्याकडे वाटचाल करताना तुम्ही जिद्दीची निवड केली तर लक्ष्य तुमची निवड करते.शुभ सकाळ

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.शुभ सकाळ

अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.शुभ सकाळ

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.शुभ सकाळ

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.शुभ सकाळ

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.शुभ सकाळ

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.शुभ सकाळ

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात.शुभ सकाळ

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील.शुभ सकाळ

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.शुभ सकाळ

मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.शुभ सकाळ

उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.शुभ सकाळ

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.शुभ सकाळ

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.शुभ सकाळ

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.शुभ सकाळ

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.शुभ सकाळ

तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.शुभ सकाळ

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.शुभ सकाळ

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो.शुभ सकाळ

खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते,सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.शुभ सकाळ

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.शुभ सकाळ

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.शुभ सकाळ

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.शुभ सकाळ

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.शुभ सकाळ

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.शुभ सकाळ

चुकण हि प्रकृती मान्य करण हि संस्कृती आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.शुभ सकाळ

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.शुभ सकाळ

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.शुभ सकाळ

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.शुभ सकाळ

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.शुभ सकाळ

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.शुभ सकाळ

ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.शुभ सकाळ

प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.शुभ सकाळ

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.शुभ सकाळ

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.शुभ सकाळ

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.शुभ सकाळ

जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.शुभ सकाळ

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.शुभ सकाळ

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.शुभ सकाळ

मित्रांनो जर तुम्हाला एक गुड मॉर्निंग कोट्स आवडले असतील तर तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल.

सराव तुम्हाला बळकट बनवतो.दुःख तुम्हांला माणूस बनवते अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.शुभ सकाळ

आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते.शुभ सकाळ

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही.शुभ सकाळ

वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.शुभ सकाळ

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.शुभ सकाळ

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात पण चांगले मित्र नक्की असतात.शुभ सकाळ

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते.शुभ सकाळ

भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.शुभ सकाळ

आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो.शुभ सकाळ

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.शुभ सकाळ

मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात.शुभ सकाळ

हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात.शुभ सकाळ

नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे.शुभ सकाळ

नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.शुभ सकाळ

आयुष्य अवघड आहे पण,अशक्य कधीच नाही.शुभ सकाळ

सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे.शुभ सकाळ

ह्या 😊 प्रेरणादायक [५००+] | | 😊 इमेजेस कशा वाटल्या आम्हाला कळवायला विसरू नका .

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग हा सापडतो त्याच प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडतेच.शुभ सकाळ

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.शुभ सकाळ

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.शुभ सकाळ

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात प्रत्येकाच्या हृदयावर काहीजण हक्काने राज्य करतात यालाच तर मैत्री म्हणतात.शुभ सकाळ

काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्‍न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.शुभ सकाळ

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं.शुभ सकाळ

अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.शुभ सकाळ

फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे तुम्हाला कधीही करायचे नाही.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.शुभ सकाळ

वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.शुभ सकाळ

तुम्हाला तुमची किंमत माहित नसेल तरी इतरांनी तिची दखल घ्यावी ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.शुभ सकाळ

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.शुभ सकाळ

कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही.शुभ सकाळ

आपले यश हे इच्छाशक्ती, स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्याची मानसिक स्थिती यावर अवलंबून असते.शुभ सकाळ

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.शुभ सकाळ

शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही शिकायला नक्कीच मिळेल.शुभ सकाळ

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल.शुभ सकाळ

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.शुभ सकाळ

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.शुभ सकाळ

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,तर तुम्ही चांगले आहात म्हणून.शुभ सकाळ

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.शुभ सकाळ

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.शुभ सकाळ

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.शुभ सकाळ

पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.शुभ सकाळ

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात.शुभ सकाळ

साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.शुभ सकाळ

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत.शुभ सकाळ

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण.शुभ सकाळ

नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.शुभ सकाळ

हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणावं लागतं जीवन हे एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं लागतं.शुभ सकाळ

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.शुभ सकाळ

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.शुभ सकाळ

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर,आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.शुभ सकाळ

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. जे चांगले असतील ते मदत करतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील.शुभ सकाळ

आई ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे की जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.शुभ सकाळ

साऱ्या जगाने साथ सोडलेल्या स्थितीत सोबत टिकून राहणारा खरा मित्र असतो.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

भाकरीचं गणितंच वेगळं आहे कोण ती कमवायला पळतायत तर कोण ती पचवायला.शुभ सकाळ

इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा स्वतःची यशकथा तयार करण्यात वेळ द्या.शुभ सकाळ

मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे.शुभ सकाळ

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.शुभ सकाळ

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.शुभ सकाळ

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.शुभ सकाळ

अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे.शुभ सकाळ खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो.शुभ सकाळ

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.शुभ सकाळ

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही.शुभ सकाळ

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात.शुभ सकाळ

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य.शुभ सकाळ

योग्य लोकांचे हात,हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही.शुभ सकाळ

सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे पांडूरंगाचे नाम सोपे होई सर्व काम.शुभ सकाळ

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.शुभ सकाळ

डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असावं.शुभ सकाळ

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत ती पण तुमच्या सारखी.शुभ सकाळ

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.शुभ सकाळ

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात.शुभ सकाळ

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.शुभ सकाळ

अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.शुभ सकाळ

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.शुभ सकाळ

श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, पण कार्य करण्यात अग्रेसर असते.शुभ सकाळ

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मनही जुळत नाही.शुभ सकाळ

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.शुभ सकाळ

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.शुभ सकाळ

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.शुभ सकाळ

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.शुभ सकाळ

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.शुभ सकाळ

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.शुभ सकाळ

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.शुभ सकाळ

मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.शुभ सकाळ

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.शुभ सकाळ

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.शुभ सकाळ

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.शुभ सकाळ

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.शुभ सकाळ

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.शुभ सकाळ

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते.शुभ सकाळ

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.शुभ सकाळ

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते.शुभ सकाळ

उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही जबाबदारी म्हणजे काय हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही.शुभ सकाळ

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही.शुभ सकाळ

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही.शुभ सकाळ

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.शुभ सकाळ

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो.शुभ सकाळ

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,त्यांची आठवण काढावी लागत नाही,ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे.शुभ सकाळ

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.शुभ सकाळ

गोड माणसांच्या आठवणींनी,आयुष्य कसं गोड बनतं दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं.शुभ सकाळ

मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे पण माझ्या जीवनात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने.शुभ सकाळ

ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.शुभ सकाळ

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.शुभ सकाळ

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.शुभ सकाळ

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.शुभ सकाळ

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.शुभ सकाळ

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते.शुभ सकाळ

मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना,पण नक्कीच मिळते.शुभ सकाळ

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.शुभ सकाळ

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी माणसं माझ्या आयुष्यात आहे.शुभ सकाळ

चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले, तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते.शुभ सकाळ

शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात.शुभ सकाळ

मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.शुभ सकाळ

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही.शुभ सकाळ

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.शुभ सकाळ

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.शुभ सकाळ

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल.शुभ सकाळ

सतत प्रयत्न करणारे बरेच काही मिळतात आणि त्यातून उरलेले वाट पाहणाऱ्यांना मिळत असते.शुभ सकाळ

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही.शुभ सकाळ

जीवनात एवढा संघर्ष करायला हवा, जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण देण्याची वेळ येणार नाही.शुभ सकाळ

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं.शुभ सकाळ

Final Word

If You like motivational quotes in marathi good morning then share with your friends and family members or socal media platform

tags:

  • Marathi Good Morning Message
  • Good Morning Images Marathi
  • Good Morning Quotes Marathi
  • शुभ सकाळ मराठी संदेश
  • शुभ सकाळ फोटो
  • शुभ सकाळचे मेसेज
  • शुभ सकाळ फोटो सुविचार
  • शुभ सकाळ शुभेच्छा मराठी
  • गुड मॉर्निंग फोटो मराठी
  • गुड मॉर्निंग मेसेज मराठी
  • सुप्रभात मराठी संदेश

Leave a Reply